काहूर

काहूर…

मनाचे गं रान….

मन काहूर काहूर।

चींती असे ध्यान,

संयमी निरंतर…! ।।१।।

मनाच्या रानात फार,

काळोख काळोख…,

अनोळखी भास तो,

गर्द रानाची ओळख ।।२।।

ध्यासाचा तो उजेड…..

ओल्या पाचूच्या रानात,

दिसू लागे पानोपान..

शुभ्र कवडश्या मनात ।।३।।

-अपर्णा काकिर्डे.

Continue Reading

माणसांची पोकळी

माणसांची पोकळी….

“माणसं कधीच जात नसतात

आठवणींमधे फिरत असतात!

तीच्यात माणसं गुंतत जातात,

भावनाभावनाच पेरत जातात!

मायेच्या ऊबी अंकूरून येतात,

कळीकळ्यात बहरून जातात!

पोकळीपोकळीत भरून येतात,

ऊनसावलीतच डोलू लागतात!

माऊलीमाणसं बघत असतात,

लेकरांच्या सूखी धन्य होतात!”

– सौ. अपर्णा काकिर्डे.

Continue Reading