माणसांची पोकळी

माणसांची पोकळी….

“माणसं कधीच जात नसतात

आठवणींमधे फिरत असतात!

तीच्यात माणसं गुंतत जातात,

भावनाभावनाच पेरत जातात!

मायेच्या ऊबी अंकूरून येतात,

कळीकळ्यात बहरून जातात!

पोकळीपोकळीत भरून येतात,

ऊनसावलीतच डोलू लागतात!

माऊलीमाणसं बघत असतात,

लेकरांच्या सूखी धन्य होतात!”

– सौ. अपर्णा काकिर्डे.

You may also like